Uncategorized

पुस्तक परिचय -‘ प्रार्थना आणि ध्यान ‘

“प्रार्थना अशी करा की सर्व काही ईश्वरावरच अवलंबून आहे आणि प्रयत्न असे करा की जणू सर्व काही स्वतःवरच अवलंबून आहे, ” असं म्हणतात कारण थोडसं “ध्यान” दिलं तर आपल्या लक्षात येईल — ‘ पिंडी ते ब्रम्हांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी ! ‘ … हाच अनुभव श्री माताजींचं ‘ प्रार्थना आणि ध्यान ‘ हे पुस्तक वाचताना …

पुस्तक परिचय -‘ प्रार्थना आणि ध्यान ‘ Read More »

श्रीअरविंदांचे पुनरागमन

भारताच्या इतिहासात ‘1893’ या सालाचे फार मोठे महत्त्व आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे भारताचा एक पुत्र जागतिक परिवर्तन घडविण्यासाठी शिकागोत गेला व अरविंद घोष त्याच वेळी पाश्चिमात्य देशातून भारत देशामध्ये आले.  ‘अरविंद घोष ते योगी अरविंद’ या परिवर्तनाची सुरुवात याच वर्षी होईल हे फक्त अरविंदांना कळालं आणि तेही खूप सूचक संकेतांमधून.  6 फेब्रुवारी 1893, हे भारताच्या स्वातंत्र्य …

श्रीअरविंदांचे पुनरागमन Read More »

मानवी उन्नयनाचे महामंदिर Auroville – उषानगरी

एकाच जागी मानवता, अध्यात्म, शांती व विश्वकल्याण इत्यादी बाबी एकत्रितपणे कार्यरत होऊन जगाच्या पुनरुत्थानासाठी पुढे सरसावतील का ? असा एक प्रश्न नियतीला पडला असावा आणि त्याच्या उत्तरादाखल भारतातील पांडिचेरी येथे Auroville म्हणजेच उषा नगरीचे निर्माण झाले असावे असे वाटते. नेमकं काय घडलं असावं ? तसे पाहू जाता पाँडिचेरी भारताचे अभ्युदय घडवणारे एक सर्वव्यापी असे आध्यात्मिक …

मानवी उन्नयनाचे महामंदिर Auroville – उषानगरी Read More »

५ डिसेंबर -योगी श्रीअरविंद यांचा महासमाधी दिवस

एखादं आयुष्य कसं जगावं, मिळालेलं शरीर ईश्वर कार्यात कसं खर्च करावं आणि शरीराचं साधन सोडावं लागल्यानंतरही विदेही अवस्थेत आपले अवतारकार्य कसं चालू ठेवावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्रीअरविंद होय. १९०८ साली त्यांनी आपले मन स्थिर आणि निर्विचारी केले. १९०९ मध्ये अलीपूर जेल मध्ये त्यांना वासुदेवम सर्वमितीची अनुभूती मिळाली, वर्ष १९२० मध्ये परब्रम्हाचा अनुभव घेऊन वर्ष …

५ डिसेंबर -योगी श्रीअरविंद यांचा महासमाधी दिवस Read More »

गीता प्रबंध

खुप लहान असताना श्री दामोदरदासजी मुंदडा यांनी मला ‘गीताई’ दिली होती. शाळेत असताना स्थितप्रज्ञाची लक्षणे आम्हाला पाठ करायला होती. घरी भग्वद-गीतेवर नेहमीच चिंतन व्हायचे. श्री अरविंदांच्या तत्वज्ञानाशी ओळख झाली व त्याचा मनावर व जीवनावर प्रभाव होताच. श्री अरविंदांचे बहुतेक साहित्य इंग्रजीतून असल्याने फारसे वाचन केले नव्हते. मध्यंतरी ठरवले की दर रविवारी आपण थोडे थोडे काही …

गीता प्रबंध Read More »

श्री अरविंद यांचे प्रतीक

पूर्णयोग साधनेबद्दल मार्गदर्शन करताना श्रीअरविंद ‘माता’ पुस्तकात दोन महान शक्तींचा उल्लेख करतात. एक आहे ‘मानवाच्या अंतःकरणातील आवाहन आणि प्रबळ अभीप्सा’ तर दुसरी आहे ‘भागवत कृपा’, जी या आवाहनाला व अभीप्सेला उत्तर देते.वरील चित्र श्रीअरविंदांच्या योग प्रतीकाचे चिन्ह आहे, ज्यामध्ये पूर्णयोग सामावलेला आहे.वरील चित्रात दोन त्रिकोण आहेत. एक त्रिकोण खालून वर जात आहे तर दुसरा त्रिकोण …

श्री अरविंद यांचे प्रतीक Read More »

ऑरोसाधना- २४ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर

                परब्रह्माशी संपर्क प्रस्थापित करण्याचे शेकडो स्वरूपाचे मार्ग आहेत. ज्या स्वरूपाचा मार्ग आपण निवडला असेल त्याच स्वरूपाचा (परब्रह्माशी जोडणारा) अंतिम अनुभव येईल. तो अनुभव अनिर्वचनीय / शब्दातीत असतो.श्रीअरविंद     ऑरोसाधना या उपक्रमास आपण दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आभारी आहे. धन्यवाद !

The Sunlit Path – पुस्तक परिचय – आरती पत्की भाटे

ह्या पुस्तकात,श्रीअरविंद इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांशी व शिष्यगणांशी मताजींच्या संभाषणातील उतारे आहेत.माताजी आपल्या श्रोत्यांना आणि वाचकांना आध्यात्मिक आत्म-परिपपूर्णतेचा मार्ग धैर्याने स्वीकारून साहसी आवाहनांना उत्तरदेण्यासाठी आमंत्रित करतात.आपले विचार कसे नियंत्रित करावेत,आपल्या आजूबाजूला असणारे अहंकाराचे कठोर कवच कसे तोडावे,परिपूर्णतेची आवश्यकता ,अशा प्रकारे अवघड मनस्थितीमध्ये असलेल्या साधकाला अंधःकारातून सूर्यप्रकाशाच्या मार्गावर जाण्यासाठी मार्गदर्शकपर ठरतात.हे पुस्तक इंग्रजी भाषे …

The Sunlit Path – पुस्तक परिचय – आरती पत्की भाटे Read More »

सिद्धी दिनाचे महत्त्व.

श्री अरविंदांच्या पूर्णयोगाच्या संदर्भात 24 नोव्हेंबर 1926 या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. क्रांतिकारक श्री अरविंद घोष यांचे बाह्य जीवन व योगी श्रीअरविंद यांचे आंतरिक जीवन यात 1910 पासून आमूलाग्र बदल घडून आला.प्रथम कलकत्त्याहून ‘चंद्रनगरला ‘जा व नंतर ‘ पॉंडिचेरी’ला जा अशा आंतरिक आदेशांनी त्यांनी आपले संपूर्ण जीवन पूर्णपणे ईश्वराच्या स्वाधीन केले. बडोदया पासून सुरू झालेली …

सिद्धी दिनाचे महत्त्व. Read More »

मीरा अलफास्सा ते माताजी एक प्रवास.

आपण सर्वजण ज्यांना श्री अरविंद आश्रमाच्या माताजी म्हणून ओळखतो त्यांचा जन्म 21 फेब्रुवारी 1878 ला पॅरिस येथे मॉरीस आणि मेथिलडे अल्फासा-यांच्या कुटुंबामध्ये मीरा अल्फासा या नावाने झाला. त्यांचे आई-वडील दोघेही बँक क्षेत्रातील मोठे प्रस्थ होते. त्यांच्यात खरेच अलौकिक प्रतिभा व सामर्थ्य यांचे दर्शन लहानपणी पासूनच दिसत होते. त्यांना पाचव्या वर्षीच हे माहीत होते की “प्रत्येकाने …

मीरा अलफास्सा ते माताजी एक प्रवास. Read More »